शिवसेनेचे रिकाम्या खुर्चीला निवेदन बेंबळी - तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंबळी ग्रामपंचायतीचा कारभार राम भर...
शिवसेनेचे रिकाम्या खुर्चीला निवेदन
बेंबळी - तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंबळी ग्रामपंचायतीचा कारभार राम भरोसे सुरु आहे. ग्रामविकास अधिकारी गैरहजर राहून उंटावरून शेळ्या हाकत असल्याने संतप्त शिवसैनिकांनी ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निवेदन दिले.
उस्मानाबाद जिल्हयात जोरदार झालेल्या परतीच्या पावसामुळे सर्व जल प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. तसेच बेंबळी गावास पाणीपुरवठा करणारा रूईभर येथील साठवण तलाही पुर्ण क्षमतेने भरला आहे. असे असूनही बेंबळी येथील प्रशासकीय अधिकारी व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या लापरवाईमुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. वर्षांतील सर्वात मोठा सण म्हणुन दिपावलीकडे पाहिले जाते. परंतु नागरिकांना सणात ही पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे.
सध्या बेंबळी ग्रामस्थाची स्थिती 'धरण उशाला, कोरड घशाला' अशा प्रकारची झालेली आहे. कोरोना व झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजुक बनली आहे. त्यामुळे गावास येत्या तीन दिवसात पाणी पुरवठा सुरू न झाल्यास दि. १३ नोव्हेंबर रोजी शिवसेनेच्या वतीने बेंबळी ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर शिवसैनिक शामसुंदर पाटील, अनिल बागल, मुकुंदराज आगलावे, किरण मोहिते, श्री राम वाळके व नाभिक महामंडळाचे जिल्हा सल्लागार दगडू राऊत यांच्यासह अन्य शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
COMMENTS