उमेदवारांचे चिन्ह वाटप झाल्यानंतर चिन्हाची आदलाबदली उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सावळा गोंधळ पह...
उमेदवारांचे चिन्ह वाटप झाल्यानंतर चिन्हाची आदलाबदली
उस्मानाबाद - उस्मानाबाद तालुक्यातील दाऊतपूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सावळा गोंधळ पहावयास मिळत आहे. उमेदवारांचे चिन्ह वाटप झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हाची आदलाबदली केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून गाव पुढारी निवडणुक प्रचाराच्या तयारीला लागले आहेत, मात्र निवडणूक विभाग गोंधळ सुरु आहे. तहसिलदारांच्या आदेशावरून ग्रामपंचायत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दाऊतपुरच्या काही उमेदवारांनाचिन्हाची आदलाबदली केली आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध लेखी तक्रार केली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी आणि बाळासाहेब सुभेदार यांची फोनवरील झालेल्या संभाषणात या घोटाळ्याला उस्मानाबाद तहसिलदार जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे.
बाळासाहेब सुभेदार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, उमेदवार प्रवीण बनसोडे यांना प्रथम ऑटोरिक्षा हे चिन्ह निवडणूक लढवण्यासाठी देण्यात आले होते. मात्र उस्मानाबाद तहसिलदार यांच्या दबावाखाली निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बनसोडे यांचे चिन्ह बदलून कप बशी हे करण्यात आले आहे. प्रवीण बनसोडे यांच्याप्रमाणेच इतर ३१ उमेदवारांचे अशाच पद्धतीने चिन्हांमध्ये आदलाबदली करण्यात आली असून यामुळे उमेदवारांना मानसिक त्रासाला ही आता सामोरे जावे लागत असून प्रचाराचे अवघे काही दिवस शिल्लक असताना दोन-दोन निवडणुकीचे चिन्ह घेऊन प्रचार कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे त्यामुळे याप्रकरणी जिल्हाधिकारी आता तहसिलदार व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वरती काय कारवाई करतील हे पाहावे लागेल.
COMMENTS